Ad will apear here
Next
‘ईमली पपिता टरबुज’ नाटकाचा शनिवारी पुण्यात प्रयोग

पुणे : ‘आबराकाडाबरा इव्हेंटस अ‍ॅन्ड एंटरटेन्मेंट’तर्फे आणि मकरंद देशपांडे यांची निर्मिती असलेले   ‘ईमली पपिता टरबुज’ हे नाटक शनिवारी, चौदा एप्रिल रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी साडे बारा  वाजता होणार आहे. अन्वय अश्तीवकर लिखित व तेजस​​ मालप दिग्दर्शित या  नाटकाचे कलादिग्दर्शन मकरंद देशपांडे यांनी केले असून, कथाही त्यांचीच आहे. 

यामध्ये आकांक्षा गाडे, अन्वय अश्तीवकर, भारत मोरे, मयुरी मोहिते, अंकित म्हात्रे, आंचल पोतदार, प्रशांत अमलानी आणि अजिंक्य पारकर हे कलाकार आहेत. या नाटकाकरिता आशिष गाडे (संगीत), अमोघ फडके (प्रकाशयोजना), टेडी मौर्य (सेटस) यांनी काम केले आहे. नाटकाचा कालावधी एक तास वीस मिनिटांचा असून, ते हिंदी आणि इंग्रजी भाषेत आहे. पाच वर्षांपुढील मुलांसाठी हे नाटक आहे. 

‘ईमली पपिता टरबुज’ हे हिंदी नाटक लहान मुलांबरोबरच  पालकांसाठीदेखील असून, ते भावंडांमधील बंध दर्शविणारे आहे. सनी आणि रिरी हे डिस्नीलँडला जाण्यासाठी उत्सुक असतात; पण कुटुंबातील काही निकडीच्या प्रसंगांमुळे त्यांची चुलत भावंडे कोकण मधून मुंबई येथे येतात. ती म्हणजे ईमली, पपिता आणि टरबुज.  सनी आणि रिरी यांना त्यांचे येणे आवडत नाही. यातूनच अनेक विनोदी, भावनिक प्रसंग  घडत जातात आणि त्यामधून त्यांच्यामध्ये आयुष्यभरासाठी ऋणानुबंध निर्माण होतात.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PZUCBN
Similar Posts
मिडास ट्रॉफी एकांकिका स्पर्धा उत्साहात पुणे : तेजल क्रिएशन्स, रिआन व आयजे कॅटॅलिस्टस यांच्या वतीने पुण्यात मिडास ट्रॉफी ही परकीय भाषांमधील एकांकिका स्पर्धा नुकतीच भरतनाट्य मंदिर येथे पार पडली. यामध्ये विद्यार्थ्यांच्या संघांनी जर्मन, इंग्रजी, स्पॅनिश, पोर्तुगीज, फ्रेंच अशा अनेक भाषांमध्ये विविध एकांकिका सादर केल्या. तब्बल १० एकांकिकांमधून सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाले
साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम पुणे : पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय
‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ पुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्टया योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल,’ असे मत जीवशास्त्र विषयातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ
‘शिखर फाऊंडेशन’ कडून स्टोक-कांगरी शिखर सर पुणे : सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील हरिश्चंद्रगडचा कोकण कडा, नागफणी, नानाचा अंगठा, मोरोशीचा भैरावगड, माहुलीचा बाण, नवरा-नवरी अशा अनेक सुळक्यांवर यशस्वी चढाया करणाऱ्या तसेच नाशिक त्रिंबकेश्वर पासून ते आंबोली पर्यंतच्या साह्यवाटा आणि गडकिल्ल्यांच्या यशस्वी मोहीमा राबवून तरुण पिढीला  गिर्यारोहण क्षेत्रामध्ये

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language